Saturday, 7 February 2015

मावळलेला पाऊस.....!


"माणसाच्या आयुष्यात सुखांची किंमत किती आहे हे मी नक्की नाही सांगू शकत. पण हि सारी सुखे आयुष्यात आणणाऱ्या माणसांची किंमत ' अतुल्य' आहे हे मी प्रकर्षाने जाणतो !."


      न्यू आर्ट्स महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र  विभागाचा माजी विद्यार्थी मेळावा  नुकताच पार पडला. या विभागाची स्थापना झाल्यानंतर म्हणजे सुमारे १९८९ पासून तर २०१२ पर्यंतचे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात विभागाने निमंत्रित केले होते. आणि या सर्व माजी विद्यार्थ्यांविषयी प्रेम असणारे सर्व प्राध्यापक हे या कार्यक्रमाचे आयोजक होते.  

Author
                                     
       कॉलेजलाईफ  संपल्यानंतर एकमेकांना भेटण्यासाठी उस्तुक असलेल्या अनेक मित्रांना  आणि मैत्रिणींना हा कार्यक्रम म्हणजे एक अनोखी पर्वणी होती. निमंत्रण पत्रिकेत नमूद केलेल्या वेळेप्रमाणे २४ मार्च या दिवशी या उस्तुकलेल्या सर्वांची पाऊलवाट त्यांना कॉलेजच्या दिशेने  घेऊन येऊ लागली..आता मनात एक हूर-हूर होती...कोण-कोण भेटेल अन...कोण भेटणार नाही ..? याची...ठरल्या वेळेत बरेच जण जमले...पण तरीही कोणीतरी येण्याचे बाकी असल्यासारखे वाटत होतेच..वाट बघता -  बघता कार्यक्रम सुरु झाला..अगदी सगळेचजण बर्याच दिवसांनी भेटले असल्याने..एकमेकांशी  भावना शेअर करण्यासाठी आसुसले होते...अखेर त्या प्रगल्भ व्यासपीठावर त्या सगळ्याच भावनांचा पाऊस ओसंडून पडला..कोणी गुरूंसाठी , कोणी मित्रांसाठी , कोणी मैत्रिणींसाठी तर कोणी...आयुष्य घडविणाऱ्या पुस्तकांसाठी भाऊक होऊन बोलत होते...परंतु दिलेल्या वेळेत सगळ्याच भावना सहज व्यक्त होतीलच असे नाही..तेव्हा काही अव्यक्त ..न बोलू शकणाऱ्या भावनाही...मना-मनांतून रेंगाळत होत्या....त्या बर्याच दिवसांनतर पडलेल्या पावसाविषयी...काही मोकळ्या भावनांचा हा अविष्कार....!

"कॉलेज लाईफ म्हटलं कि आयुष्यातील उमलत्या भावनांचा धगधगता कोपरा' असं मला नेहमी वाटतं. कारण नुकत्याच उमलायला लागलेल्या या वयात अनेक गोष्टी आपला नकळत पाठलाग करीत असतात..आणि विशेष म्हणजे  त्यातीलच अनेक गोष्टींसाठी आपणही नकळत हळवे होत जातो...!
    मी अहमदनगर शहरात दै.सार्वमतमध्ये उपसंपादक म्हणून काम करत असताना प्रा.कडलग सर यांची भेट झाली. मला बी.एस्सी. ला चांगले मार्क्स होते त्यामुळे त्यांनी अर्थातच एम.एस्सी.ला प्रवेश घ्यायला सुचवले.. माझ्या अनेक अडचणी होत्या. जॉब सोडला तर आर्थिक अडचण येणार होती हेही मी सरांना सांगितले. पण सरांनी सहकार्याची भावना दाखवली, त्यामुळे काहीच दिवसांनी मी जॉब सोडून दिला आणि  केवळ १४०० रुपये  भरून अडमिशन घेतले. उर्वरित फी भरण्यासाठी  पुन्हा दैनिक एकमत मध्ये जॉईन झालो...
  त्यानंतर आयुष्यातल्या एका वेगळ्याच संघर्ष्याला सुरुवात झाली..अन मी दोन बाजूंनी पहाड असणार्या फटीत अडकलो. एकीकडे ऑफिस आणि दुसरीकडे एम.एस्सी.चे प्रात्यक्षिक असायचे.  त्या दिवसांचं शेडूल इतकं प्याक होतं कि, पाहिलं सेमिस्टर जवळ आलं तेही कळलं नाही. पण त्या काळात मला माझ्या ऑफिसने , सर्व शिक्षकांनी  आणि माझा मित्र सुमित आणि मैत्रिणींनीही खूप मदत केली. त्यानंतर दुसर्या सेमिस्टरला मी जॉब बंद केला आणि अभ्यास करू लागलो. खरं तर मी त्या वेळी अभ्यास फारसा करत नसायचो. पण मला ग्रुप फार चांगला मिळाला होता. माझ्या वर्गात सुमित , प्रवीण आणि मी (कृष्णा) असे तिघेच मुले होतो. आणि बाकी सगळ्या मुली होत्या. त्यात पिंकू,मोनू,शीतल,कांचन,दक्षायानी,रोहिणी,पुनम,राणी,सुवर्णा आणि..स्मिता असा ग्रुप होता. या ग्रुप मध्ये प्रवीण आणि सुमीत फार काळ सुट्टीवर जायचे..मग मी एकटाच असायचो. तेव्हा माझ्या मैत्रीनिनीही मला कधी दूरचं असल्यासारखं भासू दिलं नाही.
   आमचा ग्रुप एक वेगळीच ओळख मिळून गेला..प्रत्येक सेमिस्टरच्या वेळी डिपार्टमेंटने आयोजित केलेल्या ट्रिपलाही आमचा भर-भरून प्रतिसाद असायचा. आमचे सर प्रा. डॉ. बी.ए.पाटील सर, कडलग सर, एम.टी.पाटील सर, डॉ .साळवे सर , डॉ.ठुबे सर,धामणे सर, डॉ.काळे सर, धुमाळ म्याडम ,कदम म्याडम, मुळे म्याडम, कारले म्याडम, या सर्वांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले. आमची टीम यशस्वी होऊ शकली. ती या सगळ्या गोष्टींच्या अनुकूलतेमुलेच ! अखेर या सगळ्या गुरुवर्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही २०११ च्या अखेरीस वनस्पतीशास्त्र  विभागाचा निरोप घेतला... आज अनेक दिवसांनी त्या आठवणींनी मनात डोकावण्याचा प्रयत्न केला..मन त्या आठवणींनी तुडुंब भरून आलं...मृगाचा पाऊस पडून गेल्यानंतर ओल्या मातीचा सुगंध दरवळत राहावा...तसेच ते क्षण आजही मनात सुगंधी होऊन दरवळत आहेत.. त्यातले पुन्हा कोणीही भेटले नाहीत...काहीजण आलेत ते फारच बदलून...त्यावेळी जी निरागसता होती ती आता जणू कुणालातरी बहाल करून ते आले असावेत असे वाटत होते... या आठवणी रेखाटत असताना मानवी मनाचं एक  अतीव दु :ख मनाला स्पर्शून गेलं ते म्हणजे, आपलीच जवळची माणसे वेश बदलून भेटायला येतात आणि इतकी नाचक्की कि ते आपल्याला ओळखत देखील नाही...! माझा महेश नावाचा मित्र मला व.पु. काळे यांचं एक वाक्य नेहमी सांगायचा- you never meets same man again ! याचा अर्थ फारच सुंदर अन व्यापक आहे..तो वर नमूद केलेल्या घटनेचा संदर्भ स्पष्ट करून जातो ...म्हणून मलाही वाटतं कि माणसांनी माणसांना भेटणं फारसं दुर्मिळ झालेलं नाही..पण मुखवटे एकमेक्कांना मिठी मारतात तेव्हा हृदयात असलेली माणसे हरवलेली नसावीत! असं असेल तर खरच सर्वांना भेटण्यात आनंद आहे..माझ्या ग्रुप मधले आम्ही चौघे-पाच जण सोडले तर बाकी कोणीही आले नाहीत..कारण त्यांना काम होतं. इतकंच! पण जे आले त्यांना ..एकमेक्कांना भेटण्याची उस्तुकता होती. माझा एक होस्टेलचा मित्र तर हे जगच सोडून गेल्याचं इथे आल्यानंतर कळलं...फार वाईट वाटलं...माणसे मरतात याचे फार वाईट नाही वाटत मला...वाईट याचं वाटतं कि त्यांना मरण्यापूर्वी शेवटचं भेटताही येत नाही..! म्हणूनच मी सुरुवातीलाच बोललोय कि, - "माणसाच्या आयुष्यात सुखांची किंमत किती आहे हे मी नक्की नाही सांगू शकत. पण हि सारी सुखे आयुष्यात आणणाऱ्या माणसांची किंमत ' अतुल्य' आहे हे मी प्रकर्षाने जाणतो. !"
      आज कॉलेज लाईफ संपून कितीतरी दिवस उलटून गेले..पण मी त्या आठवणींवर जगतो आहे..सगळ्याच आठवणी गोड आहेत असे नाही पण ज्या चांगल्या आहेत..त्या सर्वच आठवणी मनाला..अन नकळत आपल्या आयुष्यालाही एक नवा रंग देतात असा माझा विश्वास आहे..मी फुललो...बहारलोय त्या दिवसांमध्ये मी त्या दिवसांना कधीच विसरू शकणार नाही. आणि आताची प्रत्येक घडी त्या दिवसांशी तुलना केली तर बेचव वाटायला लागते...मग मनाला प्रश्न पडतो...का आपणही थोडे बदलत चाललोय ? मान्य आहे कि भोवतालची परिस्थिती आज आपल्याला बदलविण्यास कारणीभूत ठरत आहे..पण या परिस्थितीच्या अमानुष पिल्लांचे ओझे घेत-घेत आपण असेच गुदमरून जायचे का?...प्रश्न अनेक आहेत..पण त्याला एक उत्तरही आहे..ते म्हणजे आपलं निरागस जगणं. कधी कधी तर वाटतं कॉलेज लाईफ संपल्यापासून आपण फक्त जगण्याचा  अभिनय करत आहोत...अन जीवन जगता-जगता जगणंच हरवून गेलोत आपण..खरंच आजही वेड्या करतात या कॉलेज लाईफमधल्या आठवणी...बिचार्या..मी बेघर झालो तरीही...त्या मनात घर करून आहेत.....!
     

                                                                                                                 
                                                                                                         - कृष्णा बेलगांवकर 
                                                                                                           krishnainfo14@gmail.com




न्यू आर्ट्स महाविद्यालयातील माझा एम.एस्सी..(२०११)

पिंकू,  स्मिता,  अश्विनी,  आम्रपाली,  कांचन,  मोहिनी,  शितल,  दाक्षायानी,  कृष्णा,  सुमित,  प्रवीण  आणि प्रा. सुभाष कडलग.


No comments:

Post a Comment